Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

कै.आनंदराव चुयेकरांच्या गोकुळात ...पक्षीय सत्ताधिशांची पदाची रासलिला ...

schedule03 Jun 25 person by visibility 278 categoryराजकीय

 
सांगरूळ विधानसभा निवडणूक कै . मा आनंदराव चुयेकर साहेबांनी
अपक्ष म्हणून सिंह या चिन्हावर ठरावीक शिल्लेदारांना सोबत घेवून निवडणूक लढवली 
या निवडणूकीचा प्रभाव अखंड महाराष्ट्र राज्याच्या व जिल्हाच्या पक्षीय राजकारणावर उमटला.
त्या नंतर चुयेकरांना गोकुळ व इतर राजकारणातून हद्दपार करायचे हा एकमेव अंजठा सुरू झाला .
त्यासाठी ज्या शिल्लेदारां नी साथ दिली त्याचे ही राजकीयदृष्ट्या खच्ची करण करण्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला .
पण मा. चुयेकर साहेंबानी आपल्या व्यावहारिक व सहकार कौशल्याने गोकुळ चे वर्चस्व अबाधित ठेवले .
२००१ ची गोकुळची निवडणूक त्यांनी स्वता पॅनेल करत जिल्ह्यातील विविध पक्षाचे मातब्बर नेते
यांच्या विरोधात निवडणूक लढवली .
जिथे विरोध घ्यायला हवा तिथे घेण्याची धमक त्यांच्यात होती.
म्हणूनच आज पर्यंत गोकुळ मध्ये जे चेअरमन , संचालक 
१० , २० , ३०, ४० वर्ष जे झालेत त्यांना संधी उपलब्ध करून दिली व गोकुळचा ७०० ते ८oo कोटी वार्षिक उलाढाली चा डोलारा सांभाळणेची कसब चुयेकर साहेबानीच घालून दिली .
 
गोकुळ मधील प्रशासन अधिकारी हा गोकुळचा पाया आहे . चुयेकर साहेबांनी हा पायाच मजबूत केला चांगले अधिकारी नेमणे ही गोकुळ साठी फायद्याची बाजू झाली व आहे .गोकुळ संघ आज जो देशात अव्वल आहे त्याचे मुख्य कारण संघ कर्मचारी व दुध उत्पादक . याची सांगड घालतच चुयेकरं साहेबांनी वेळोवेळी राजकीय विरोध लाथाडून सर्व संचालकांच्या सहकार्याने गोकुळ ला देशांत व ग्राहकांच्या घरा घरात पोहचवले.
गोकुळ मध्ये राज्याच्या वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप हा कित्येक काळपासून आहेच .
आमदारकी नको पण गोकुळचे संचालक करा यांकरिता राज्यांच्या नेतृत्वां चा सपोर्ट घ्यावाच लागत होता .
गोकुळ आज जे उभा आहे ते निव्वळ कै . आनंदराव पाटील चुयेकर साहेबांच्या दुरदृष्टी मुळेच . गावागावात दुध उत्पादकाच्या घरात आज जे ऐश्वर्य आहे ते निव्वळ चुयेकर साहेबा मुळेच .
दुध डेरी स्वभांडवल टोलेजंग इमारती डौलदार आहे ते मा चुयेकर साहेबा मुळे .
ताराबाई पार्कात डॉकयार्ड होते तेथून ते मुंबईला इध जाताना कित्येकदा नासायचे त्यामुळे संघ तोट्यात होता.
पण या सर्वातून पर्याय काढत काही हजारांत गोळा होणारे इध आज घडीला लाखात रोज गोळा होते
 
गोकुळ मध्ये पक्षीय राजकारण आले आणि सत्ता व आर्थिक तडजोडी सुरू झालेत . कै चुयेकर साहेंबा च्या मृत्यूनंतर गोकुळ संघ हा आर्थिक सक्षम झालाच
पण त्यातील कारभारी मंडळी व राजकीय नेत्यांनी गोकुळची सत्तेची मलई आपल्या च कडे कशी राहील यासाठी पक्षीय विचारधारा गुंडाळून मी व माझाच कसा यात जाईल व सत्ता माझ्याच इशार्यावर कशी ठरावातून चालेल याकडे गणित मांडत आलेत .
आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था शेतकरी संघ
याची आजची अवस्था याच सर्व विचारधारेच्या पक्षीय नेत्यांनी आज काय केलीय हे आपणा पुढे मोठे वेगवेगळे घोटाळाचे पराक्रमाचे
आदर्श डोळ्या समोर शेतकरी संघात घडत आहेतच.
 
केडिसीसी बॅक अवसानात घालवली पण बॅकेवर प्रशासक आला व बॅक कर्मचार्या नी वसूली हातात घेवून जिवावरील हल्ले परतवून बॅक नफ्यात आणली . ज्यांनी कोणताच निकष न पहाता निव्वळ राजकारणासाठी कर्जे वाटप केलीत ति वसूली बॅक कर्मचा र्यांनी केली .
सध्या जिल्हात चुकीचा राजकीय वारसेचा पायंडा पडला आहे . कट्टर कार्यकर्त्याला किंमतच उरली नाही .गावच्या विकास सेवा / दुधसंस्था शिक्षणसंस्था , सहकारी बॅका , विविध खरेदी विक्री संघ ते साखर कारखाने येथे तिन ते चार काही पिढयांचे संस्थापक वारसदारच कारभार करू शकतात असे वातावरणच तयार झालय .
 
गोठ्यात जो जनावरे सांभाळत आलाय त्याचीच पिढी सुनाबाळे आजही शेणा मुतवातच आपला वारसा पुढे नेत आहेत . ऊस उत्पादक शेतकरी आपला पुढचा वारस स्वता हातात खुरपे घेवून ऊसतोडीतच कष्टांचा वारसा हक्क पुढे नेत आहेत .
परवाच गोकुळचे चेअरमन निवड महानाटय झाले .
जिल्हातील इतर सर्व राजकीय घराण्यातील 
ज्येष्ठ वारसदारांनी 
नियम मोडला .
साखर कारखाने , सुतगिरणी किंवा इतर संस्था तील पदाचे वारसा हक्काचे नियम धाब्यावर बसवत 
मा . आनंदराव पाटलांनी गोकुळ मध्ये पूर्ण जीवन घालवले त्यांचाच वारसाला शशिकांत पाटलांना
जेव्हा नेतृत्व देण्याची वेळ आली त्यावेळी त्या सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांच्या अलिखीत वारसदारांच्या परंपरेला खीळ बसवली .
"आनंदा " च्या दारात मांडव घालणार्या एका निष्पाप "शशिकांत "च्या कारकीर्दीला
खोडा टाकला .
ज्या चुयेकरांनी हा गोकुळ मोठा केला त्याच चुयेकरांचा
 शांत , संयमीवारस  
मा . शशिकांत पाटील चुयेकर चेअरमन पदाला चालला नाही .
कै. आनंदराव पाटील चुयेकरांनी वेळोवेळी जिल्हायाच्या राजकारणाला व पक्षीय नेत्यांना जी धोबीपछाड दिली तिच ताकद तोच विरोध
मा . शशिकांत आनंदराव पाटील ( चुयेकर ) यांनी क्षमता र्निमाण करणे ही दुध उत्पादकाच्या व गोकुळ दुध संघाच्या भविष्याच्या दुष्टीने महत्वाचे नविन पर्वाची नांदी असेल .
ज्यांनी म्हैसीचे दुध व शेण मुत काढले नाही वैरणीचा बिंडा डोकयावरून आणला नाही तसेच गायी म्हशी चे दुध धार पिळली नाही
दुधसंस्था चालवली नाही 
आज असलेच लोकं
जिल्हाच्या गोकुळच्या सर्वोचे पदावर
निवळ पक्षीय वारसदार म्हणून सहज विराज मान होत आहेत .पण या गोकुळच्या पदाचा हव्यास असणार्या गर्ब श्रीमंत वारसांना लक्षात येत नाही की जर गोकुळ संपले , संपवले तर प्रत्येक दुध उत्पादकांच्या घरातील वैभव संपेल .त्या घरातील सुखाची स्वप्ने भंगतील.गाई म्हशी विना गोठे ओस पडतील
खेडी वाड्या वस्त्या आर्थीक संकटात येतील त्यामुळे
गोकुळ दुध संघात पक्षीय राजकारण न आणता
गोकुळचे संचालक , कर्मचारी , दुध डर्या ,
दुध उत्पादक व
दुध ग्राहक यांच्याच नियोजनाचे अधिकाराचे व नफ्यांचे गोकुळ राज यावे
ही माझ्या सारख्या दुध उत्पादकाची सदईच्छा ...
 
जिल्हातील व राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही आपले पक्षीय राजकीय डाव व 
तडजोडीचे पदांचे भाव
कोल्हापुरच्या वैभवसंपन्न सहकारात न आणता
पक्षीय राजकारणाच्या मैदानातच सत्तेच्या कवायती कराव्या हीच अपेक्षा ......
 
पशुपालक 
मा . मुकुंद पाटील
कसबा बीड
ता . करवीर जि . कोल्हापूर
फोन -९६०४३६४५४९
 
दि. ३ जून २०२५

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
JSON Output

    
themes